"विचार माझे कुठे हरवले.. "
शब्द का रुसले माझ्यावर..
लेखन माझे कुणी पळवले..
सुचे न काही किती चिंतुनी..
विचार माझे कुठे हरवले..
मित्रवत मज विचार माझे..
नकळत माझ्या कुणी लपविले..
निराशेची ठिणगी पडता..
असतील का ते जळूनी गेले..
शोधूनी मज ते सापडतील का..
महत्व मज त्यांचे जाणवले..
माझेच होते का सोडूनी गेले..
विचार माझे कुठे हरवले..
-भूषण जोशी
No comments:
Post a Comment