Friday 25 December 2015

"चित्रपट - बाजीराव मस्तानी"

"चित्रपट - बाजीराव मस्तानी"

भंसाळी साहेबांना मुजरा घालावासा वाटतोय.. सुरेख.. अप्रतिम.. उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी बाजीराव पेशवा आणि मस्तानी ह्यांची प्रेम कहाणी लोकां समोर मांडली आहे. अमिताभ जी ह्यांनी नुक्तेच रणवीर ला ह्या सिनेमा बद्दल कौतुकाची थाप दिली होती आणि म्हणाले होते-  "अरे यार बाजीराव मस्तानी का नशा उतर हि नहीं रहा"

मी खरे तर खूप उशिरा बघितला हा चित्रपट. खरोखर पेशव्यांना बघून मान गर्वाने उंचावते. अद्भुत शौर्य.. असिमित वीरता.. तीक्ष्ण बुद्धी आणि वाक्चातुर्य.. कुणी ही अगदी सहज प्रेमात पडेल असे व्यक्तिमत्त्व. रणवीर सिंघ पेक्षा चांगला अभिनेता ह्या भुमिके साठी मला सुचत नाही. मोहून टाकणारा अभिनय. सुरेख रित्या त्याने मराठी चाल पकडली आहे. सिनेमा बघताना एका क्षणा साठी सुद्धा असे वाटत नाही कि रणवीर हा पंजाबी कलाकार आहे म्हणून. ह्यालाच म्हणतात अभिनय कौशल्य. रणवीर चा मी नव्याने fan झालोय.

शिवाय दीपिका आणि प्रियंका ह्यांचे सौंदर्य आणि अभिनय दोन्ही उत्कृष्टच. प्रियंका ने सुद्धा मराठी बाणा उत्तम पकडला आहे. सगळ्याच कलाकारांचे काम खूप सुंदर आहेे. चित्पावन ब्राम्हणी संस्कृती अतिशय सुरेख दर्शविली आहे. शनिवार वाड्या ची भव्यता बहरुन देणारी दाखवली आहे. आजच्या शनिवार वाड्यात असे काहीच बघण्यास मिळत नाही. भंसाळी ह्यांचं काम अप्रतिमच आहे..असते.

चित्रपटात आक्षेपार्ह अश्या फार क्वचित गोष्टी दिसल्या. पण तार्कीक बुद्धि वापरता त्या सुद्धा योग्यच वाटतात. अर्थातच हे सर्वस्वी माझे मत आहे. मी काही इतिहासकार नव्हे तरी मला असे वाटते कि आजवर बाजीराव आणि मस्तानी ह्यांच्या संबंधांना चुकीच्या पद्धतीने समाजा समोर मांडण्यात आले जेणेकरुन समाजा मधे वेगळाच संदेश जावा. विशेषतः राजकुमारी मस्तानी बद्दल बरेच गैरसमज पसरविले गेले. बाजीराव चुकले होते हे मी सुद्धा मान्य करतो. त्यांनी वेळीच पत्नीव्रता पति सारखे मस्तानीला स्पष्टपणे लांब रहाण्याचे सांगितले असते तर बहुदा जे घडले ते घडले नसते. पण प्रेम आंधळे असते असे म्हणतात. शिवाय श्री कृष्ण, राधिका आणि रुक्मिणी ह्यांच्या कथेची बहुदा ती पुनरावृत्तीच होती जी विधीलिखित असावी. असो.. चित्रपटा मुळे मात्र माझ्या मनात असलेले भ्रम दूर झाले. अतिशय उत्तम पद्धतीने ही कथा लोकां समोर मांडली गेली आहे.

दोन्ही हातात शस्त्र घेउन जेव्हा बाजीराव शत्रूच्या सेनेवर तुटून पडतात तेव्हा पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी एकट्याने खिंड लढवणारे वीर बाजीप्रभू देशपांडे आठवतात..

२०,००० सैन्यबळ असलेल्या निझामाला जेव्हा बाजीराव आपल्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेने लढाई न करता नमवतात तेव्हा खुद्द छत्रपती शिवाजी महाराज आठवतात..

भंसाळी साहेबांनी जरी ह्या चित्रपटा द्वारे प्रेम कहाणी दाखविण्याचे प्रयत्न केले आहेत तरी त्यांनी पेशव्यांच्या शौर्याबद्दल कुठेच तडजोड केलेली दिसत नाही. पेशवे जेवढे सुरेख प्रियकर आणि पति म्हणून दिसतात तेवढेच शूर योद्धा सुद्धा दिसतात. 

चित्रपटातील संगीत तर अप्रतिमच. "अलबेला सजन आयो रे", "मल्हारी", "पिंगा", "दीवानी मस्तानी" गाणी तर जणू नाचायला भाग पाडतात. चित्रपटात कुठे ही कंटाळ येत नाही. उत्सुकता कायम राहाते.  सर्वांनी हा चित्रपट एकदा तरी बघावा.

-भूषण जोशी

Tuesday 15 December 2015

सुप्रभात..

सुप्रभात सुमन सुगंध हा..
सुख देवुनि जातो मला..
सुख गंध जणू सुविचार तो.. 
संचारतो अवघ्या मना..

सुरुवात सुखि दिवसाची हो..
सुंदर सुरेख सुखात हो..
अति शोभनीय अति दर्शनीय..
अति वंदनीय सुप्रभात हो..

अति शुभ्र जणू हैमाद्र ती..
किती दिव्य जणू दिव्याद्र ती..
असे तेजपुंज नभात ती..
येवो सदा सुप्रभात ती..

सुमधुर सुमंगल प्रेरणा..
आशेची नव जणू चेतना..
ऐसी सुरेख पहाट हो..
देवांस हेची प्रार्थना..

-भूषण जोशी

Friday 11 December 2015

एक विचार.. अभ्यासक्रमात सावरकर का नाहीत?


माझे शिक्षण केंद्रिय माध्यमातून झाले आहे.. मला आठवते कि "वीर सावरकर" नावाने आम्हाला हिंदी विषयात एकच धडा होता.. त्याहून अधिक सावरकरां बद्दल कधीच कळाले नाही.. खूप अलीकडच्या काळात त्यांच्या बद्दल वाचण्यात आले तेव्हा जाणवले कि देश केवढ्या मोठ्या विभूति ला मुकला आहे.. खरोखर तेज पुंज होते वि. दा. सावरकर. अश्या तेजस्वी व्यक्तिमत्वाच्या देशभक्ता बद्दल शैक्षणिक अभ्यासक्रमात फक्तं एकच धडा? दुर्दैवच म्हणावे हे आजच्या पिढीचे. माझे असे ठाम मत आहे कि स्वा. वीर सावरकरां बद्दल केंद्रिय आणि राज्यस्तरीय अभ्यासक्रमात निश्चितच धडा नव्हे तर धडे असावेत. आज जरी इंग्रज नसले तरी त्यांच्या पेक्षा हि कैक मोठ्या शत्रूंना आजच्या पिढी ला सामोरे जावे लागत आहे.. तेव्हा सावरकरांचे विचार शिवाजी महाराजां प्रमाणेच सगळ्यां साठी अतिशय उत्स्फूर्तकारी व प्रेरणादायक ठरतिल. त्यांच्या देशभक्ति ने ओतप्रोत असलेल्या कविता वाचून प्रत्येक देशवासीया मध्ये देशा साठी आदर प्रेम नक्कीच जागृत होइल ह्याची मला खात्री वाटते. सावरकरां बद्दल अवघ्या देशाला माहिती असायला हवी. सावरकर हे मराठी असले तरी अवघ्या देशा साठी लढत होते. तेव्हा जगाला त्या तेज पुंजा बद्दल सारे काही कळायला हवे. असे महान पुरुष युगात एकदाच जन्माला येतात. त्यांचे विचार हे प्रत्येका पर्यंत पोहोचलेच पाहिजे.

आपला,
भूषण जोशी

Monday 7 December 2015

कवितांचा शेतकरी..

दिवस कित्येक उलटून गेले..
रथ लेखनाचे थांबून गेले..
इच्छा होवेना काय लिहावे...
विषय अवघे जणू हरपून गेले..

उकरून धरणी माझिया मनाची..
शेत वैचारिक अवघे नांगरले..
बीज नवीन कल्पनाशक्तीचे..
अंतरी तया मी सदा पेरले..

पिकावानि रचना माझ्या त्या..
फुलुनि अवघ्या सुरेख लहरति..
प्रफुल्लित होवून शब्दसुमनाने..
चित्तहरण जणू त्या करति..

असो मी शेतकरी वेगळा..
शेती मी कवितांची करितो..
फळे फुले नवरचनांकुरित..
साहित्याचे बाग सजवितो..

- भूषण जोशी