दिवस कित्येक उलटून गेले..
रथ लेखनाचे थांबून गेले..
इच्छा होवेना काय लिहावे...
विषय अवघे जणू हरपून गेले..
उकरून धरणी माझिया मनाची..
शेत वैचारिक अवघे नांगरले..
बीज नवीन कल्पनाशक्तीचे..
अंतरी तया मी सदा पेरले..
पिकावानि रचना माझ्या त्या..
फुलुनि अवघ्या सुरेख लहरति..
प्रफुल्लित होवून शब्दसुमनाने..
चित्तहरण जणू त्या करति..
असो मी शेतकरी वेगळा..
शेती मी कवितांची करितो..
फळे फुले नवरचनांकुरित..
साहित्याचे बाग सजवितो..
- भूषण जोशी
No comments:
Post a Comment