Friday 11 December 2015

एक विचार.. अभ्यासक्रमात सावरकर का नाहीत?


माझे शिक्षण केंद्रिय माध्यमातून झाले आहे.. मला आठवते कि "वीर सावरकर" नावाने आम्हाला हिंदी विषयात एकच धडा होता.. त्याहून अधिक सावरकरां बद्दल कधीच कळाले नाही.. खूप अलीकडच्या काळात त्यांच्या बद्दल वाचण्यात आले तेव्हा जाणवले कि देश केवढ्या मोठ्या विभूति ला मुकला आहे.. खरोखर तेज पुंज होते वि. दा. सावरकर. अश्या तेजस्वी व्यक्तिमत्वाच्या देशभक्ता बद्दल शैक्षणिक अभ्यासक्रमात फक्तं एकच धडा? दुर्दैवच म्हणावे हे आजच्या पिढीचे. माझे असे ठाम मत आहे कि स्वा. वीर सावरकरां बद्दल केंद्रिय आणि राज्यस्तरीय अभ्यासक्रमात निश्चितच धडा नव्हे तर धडे असावेत. आज जरी इंग्रज नसले तरी त्यांच्या पेक्षा हि कैक मोठ्या शत्रूंना आजच्या पिढी ला सामोरे जावे लागत आहे.. तेव्हा सावरकरांचे विचार शिवाजी महाराजां प्रमाणेच सगळ्यां साठी अतिशय उत्स्फूर्तकारी व प्रेरणादायक ठरतिल. त्यांच्या देशभक्ति ने ओतप्रोत असलेल्या कविता वाचून प्रत्येक देशवासीया मध्ये देशा साठी आदर प्रेम नक्कीच जागृत होइल ह्याची मला खात्री वाटते. सावरकरां बद्दल अवघ्या देशाला माहिती असायला हवी. सावरकर हे मराठी असले तरी अवघ्या देशा साठी लढत होते. तेव्हा जगाला त्या तेज पुंजा बद्दल सारे काही कळायला हवे. असे महान पुरुष युगात एकदाच जन्माला येतात. त्यांचे विचार हे प्रत्येका पर्यंत पोहोचलेच पाहिजे.

आपला,
भूषण जोशी

No comments:

Post a Comment