भोळ्या मना
भोळ्या मना रे भोळाच तू..
करतोस का व्यर्थ आशाच तू..
प्रेमळ तुझ्या भावना ह्या जरी रे..
पाषाण हृदयी त्या तमाशाच तू..
रस प्रेम-अमृताचा..
बुडत होतो एकटाच अपमानाच्या सागरी..
वाचवीलेस जणू मला तू नेऊनि खडकावरी..
जगतो कसा-मसा मी पिऊनि घोट कडू शब्दांचा..
आज जणू मज मुखी लाभला रस प्रेम-अमृताचा..
हक्क आहे ग तुला..
राग यावे काय ऐसे..
आपल्यात सांग न..
मैत्री होती कधी पन
संपली का सांग न..
हक्क नाहि का तुझ्यावर..
रागविण्याचा मला..
तू जरी रुसलीस मज वर..
हक्क आहे ग तुला..
थंड हिवाळी
सकाळ होती थंड हिवाळी,
अलगद वारा लागत होता,
उन्हात बसलो त्याच सकाळी,
जणू उन्हाळा मागत होता..
मोहभंग
थकलो सहन करुनी मी आता ..
खाऊनी कोडे मोहभंगाचे..
इच्छा मेल्या निरपेक्ष झालो..
पार तुकडे केले हृदयंगाचे..
प्रेम दिले मी अफाट जयाला..
मोडुनि मन माझे तोच गेला..
स्वप्नांच्या मज जळत्या दिव्याला...
जणू संत वाराच विजवून गेला..
"रेव पार्टी.."
मदिरा नाच आणि नशा..
करतात होताच सांज निशा..
नसते भान स्वतःची जेथे..
न कळते कुणास कुठली दिशा..
करतात श्रीमंत बिघडलेली कार्टी..
अश्याच पाश्चात्य विकारास येथे..
इंग्रजीत म्हणता "रेव पार्टी.."
ध्वजावरोहण…
ध्वजावरोहण सदा पाहता उर भरुनी मज येते..
ध्वजास बघता गर्वाने मग मान ही उंच होते..
विजयी विश्व तिरंगा पाहुनी भारतीयता अनुभवते..
देशा साठी प्राण अर्पीणार्यांची आठव होते..
प्रेम म्हणजे फक्त प्रेम असावं..
प्रेम म्हणजे फक्त प्रेम असावं..
त्यात वासनेचं खुळ नसावं..
वयाची अट नसावी..वेळेची वट नसावी..
नाती कधी गोड तर कधी आंबट असावी..
ती चावट असली तरी बावळट नसावी..
तिखट असली तरी कडवट नसावी..
प्रेम म्हणजे फक्त प्रेम असावं..
त्याला अर्थ नसलं तरी त्यात स्वार्थ नसावं..
प्रेमळ मन माझे…
प्रेमळ मन माझे तुज साठी कधीच का ओळखत नाही..
आठवणीला तुझ्या कधी मज कारण गं लागत नाही..
गोड जशी तुझी छवी तशी का गोड कधी वागत नाही..
साथ हवी मज तुझी अजून काही तुज मी मागत नाही..
शान.. देशाची..
सुंदर सुरेख.. लाखात एक..
पण झाली ती लेक.. देशाची..
शिकुनी छान.. वाढविला मान..
तिने राखिली शान.. देशाची..
जगणे ऐसेची सार्थ करावे..
जन्मुनी धरेवर काय करावे..
न धन साठवावे न संपत्तीस मोहावे..
न स्वतः दुखावे न कुणास दुखवावे..
संतोष सदा मनात आणावे..
कर्तव्य सदा श्रेष्ठ जाणावे..
प्रेम अर्पावे माणसं जोडावे..
माणूस आहोत माणूसच रहावे..
जगणे ऐसेची सार्थ करावे..
के आए थे मैदान-ए-जंग में..
हम भी पाक दामन के साथ..
कि जंग-ए-फ़तह तो मिल गयी..
मगर दामन-ए-पाक ना बचा सके..
"वातावरण जरी पावसाळ तरी आंब्याचा मात्र येणार दुष्काळ.."
(दिनांक-०१/०३/२०१५)
पाउस आला कसा अवकाळी..
झरा लागल्या जणू पावसाळी..
गारठा मिळाला ऐन उन्हाळी..
पण अंबा पुन्हा गेला दुष्काळी..
Feeling भक्तिमय..
भान हरपुनी गेले पडताच राग मज कानी..
झाली पहाट माझी ऐकूनी अभंग वाणी..
विट्ठल नाम गाता वाटे जणू संताची वाणी..
आवाज तो पंडितजींचा अतिगोड मधुर कल्याणी..
"जावे कवितांच्या गावा.."
जावे कवितांच्या गावा..
प्रत्येक शब्द उजळावा..
कविता नव नित रचतांना..
नव-सूर्य जेथुनि उगावा..
का अबोल..
मित्र शब्दांचे कवी सखोल..
का राहावे त्यांनी अबोल..
विचार मांडणी जयाची अनमोल..
कधी न जाई तयाचा तोल..
"फुकटचे तत्वज्ञान नको"
ऊपदेशिने सोपे जरी त्यावर चालणे मात्र कठीण..
ऐसेचि तेही भ्रामक जैसे सोन्याचे हरीण..
आधी नीती-निखार्यांवर स्वतः चालून पाहावे..
नंतर अवघ्या जगाला तत्वज्ञान वदावे..
क्रोध आवरावा..
नियंत्रण नसे जेव्हा क्रोधा वरी..
जीभ भाल्यागत वार करी..
विना स्पर्शिता अंगाला ती..
सरळ हृदयी आघात करी..
"फुकटचे तत्वज्ञान नको"
ऊपदेशिने सोपे जरी त्यावर चालणे मात्र कठीण..
ऐसेचि तेही भ्रामक जैसे सोन्याचे हरीण..
आधी नीती-निखार्यांवर स्वतः चालून पाहावे..
नंतर अवघ्या जगाला तत्वज्ञान वदावे..
पावसाळ धारा..
बरसू लागल्या पावसाळ धारा..
ओलाचिंब झाला अवघा पसारा..
न आवड मला तरी हि भिजलो..
गारठा देई अंगास शहारा..
तृष्णा धरेची भागली जराशी..
शेतीस लाभे अमृत सहारा..
मोल पावसाचे न कळे कुणा जर..
शेतकरी अन धरतीस विचारा..
आगमन गणपतीचे..
प्रथमपुज्य पार्वती नंदनाचे..
स्वागत असो त्या सूरपतीचे..
लाभो सुख आनंद चैतन्य..
होता आगमन गणपतीचे..