"विचार-भूषण" हा ब्लॉग मी माझे विचार लोकान पर्यंत पोहोचावेत ह्या हेतू ने सुरू केला आहे.. ह्यात मी माझे लेख आणी कविता लिहून पोस्ट करत आहे.. माझ्या लेखनाने जर काही बदल घडून येत असेन तर मी माझी लेखनी सफळ झाली असे मानेल..
Thursday 14 May 2015
दडपण ठेवू नकोस..
दडपण ठेवू नकोस..
रुसुनी कुणावर काय साधते तू..
मनात काय ते सांगून टाकावे..
जीवन अवघे हे दोन क्षणांचे..
वैर धरून का व्यर्थ करावे..
अबोल तुझा स्वभाव जरी गं..
दडपण तरी का हृदयी असावे..
बोलुनी कुंठा तुझिया मना तू..
दुख-पाषातून मुक्त करावे..
-भूषण जोशी
ठेच लागलेला..
ठेच लागलेला..
सुंदर तुझिया नयनांची मज..
नयनांशी गं पेच लागली..
रूप खरे सामोरी येता..
हृदयाला जणू ठेच लागली..
सुंदर किती जरी जग दिसते..
कळले मज ते भ्रामक असते..
भोळे मन बघुनी सुंदरता...
नकळत सदा जाळ्यात फसते..
आयुष्यात काही लोकांना भेटल्या नंतर एका कथनाची शाश्वती होते ते म्हणजे "सुंदर दिसणे आणि सुंदर असणे ह्यात खूप फरक असतो" खरे आहे.. अश्याच काही खूप सुंदर दिसणाऱ्या आणि गोड बोलणाऱ्या लोकांना भेटून हा विचार मनात आला आणि हे कथन पटले.. असो.. देव त्यांना सद्बुद्धि देवो.. आपण मात्र आपल्या परीने प्रामाणिक राहायला हवं.. बोलण्यात आणि वागण्यात कधीही गफलत व्हायला नको..
-भूषण जोशी
Subscribe to:
Posts (Atom)