मन माझे
अरे सांग देवा मज काय झाले..
अलगद कुणी मज हृदयात आले..
सम्राट मीच माझिया मनाचा..
तरी का मनावर तिचे राज्य झाले..
हृदय माझे जणू हे मृदंग झाले..
ठोके हि तालात ऐकण्यास आले..
अचानक जणू का हे मन शांत झाले..
स्वकीयांच्या त्या गर्दीत एकांत झाले..
प्रेमात पडता काय ऐसेच होते..
मनी प्रश्न अमोज निर्माण झाले..
चीडवूनी मित्र हि हेच म्हणाले..
हृदय घेवूनी प्रेम पक्षी उडाले..
-भूषण जोशी
No comments:
Post a Comment