Sunday, 18 October 2015

चिऊताई सावरली असेन..

मित्रानो.. 'मंगेश पाडगावकर' ह्यांची कविता "दार उघड चिउताई" पासून प्रेरणा घेउन काही ओळी सुचल्या.. "चिऊताई सावरली असेन.." आवडल्यास प्रतिक्रिया अवश्य द्या..

नक्कीच चिऊताई घाबरली असेन..
पण कविता वाचून सावरली असेन..

दार तिने उघडलं असेन..
जग तिचं बदललं असेन..

चिमणा एक आला असेन..
तिला येऊन म्हणाला असेन..

चिऊ तू घाबरू नकोस..
एकटी जगात वावरू नकोस..

सोबत माझ्या घे भरारी..
तुला दाखवेन दुनिया प्यारी..

सगळेच इथे कावळे नसतात..
बगळे ही इथे सावळे असतात..

होवु तयांचे सोबती..
जे कधी साथ न सोडती..

आशा नवीन घे मनात..
आनंद बघ सदा जीवनात..

मी तुझ्या सोबत आहे..
इच्छा नवीन ओवत आहे..

साथ तुझी न कधी सोडणार..
मरे पर्यंत तुझ्या सवे जगणार..

चिऊ तू माझा विश्वास कर..
निराशा सोड नवा ध्यास कर..

तुझं दुःख आता मज पाहे ना..
ये बाहेर मी आहे ना...
ये बाहेर मी आहे ना..

-भूषण जोशी

No comments:

Post a Comment