Monday 7 March 2016

तो फक्तं खरा असतो..

कधीकधी माणूस वाईट नसतो..
तो फक्तं खरा असतो..
समाज त्याला पागल म्हणतो..
पण बुद्धीने तो बरा असतो..
काहीं साठी तो दगड..
तर काहीं साठी हिरा असतो..
कधीकधी माणूस वाईट नसतो..
तो फक्तं खरा असतो..

सरळ मार्गावर चालणारा तो..
गैर वागणे टाळत असतो.. 
अनेक डाग तो पुसत असतो..
कित्येक वार तो सोसत असतो..
स्वतः जळून धधकत्या अग्नीत..
प्रकाश देणारा तो तारा असतो..
कधीकधी माणूस वाईट नसतो..
तो फक्तं खरा असतो..

डाग लावणारे ही त्याचेच असतात..
वार करणारे ही त्याचेच असतात..
अश्या बऱ्याच स्वकीय शत्रूंशी..
तो एकटाच झुंजणारा असतो..
कौरवांच्या चक्रव्यूहात अडकलेला..
अभिमन्यू तो बिचारा असतो..
कधीकधी माणूस वाईट नसतो..
तो फक्तं खरा असतो..

मान त्याला मिळो ना मिळो..
पण अपमान त्याचा टळत नसतो.. 
मान-अपमानाच्या कैचीत अडकून..
मरता मरता तो जगत असतो..
अन्यायाच्या कडक उन्हाळ्यात..
न्यायाचा तो शीतल वारा असतो..
कधीकधी माणूस वाईट नसतो..
तो फक्तं खरा असतो..

पाउलोपावलि संघर्ष करणारा तो..
कुणी Super hero नसतो..
साधा सरळ Common man तो..
लोकांच्या नजरेत Zero असतो..
पण कर्तव्यनिष्ठ तोच Common man.. 
प्रत्येक संकटात साथ देणारा असतो..
कधीकधी माणूस वाईट नसतो..
तो फक्तं खरा असतो..

-भूषण जोशी

No comments:

Post a Comment