काही परिचित विचारत आहेत मला- "काय भूषण!! नवीन वर्ष कसा साजरा केलास? पार्टी कशी झाली?"
त्यांचे प्रश्न योग्य आहेत पण आता त्यांना कसे सांगावे कि आमच्या करता
नवीन वर्ष म्हणजे फक्त भिंतीवरचं जुनं Calender काढायचं आणि नवीन लावायचं.
मद्यपान आम्ही करत नाही, मांसाहार चालत नाही, DJ ची किंवा डिस्को ची हाउस
नाही, आई-वडिलांचा आशिर्वाद घेतला आणि नवीन वर्षात प्रवेश केला. आई ने
शेवया ची खीर केली होती त्यानेच तोंड गोड करून २०१४ ला bye-bye केलं.
देवाला प्रार्थना केली कि बाबा हे नवीन वर्ष आम्हा सगळ्यांना सुखाचं,
समाधानाचं, समृद्धीचं आणि शांततेत जावो असा आशिर्वाद दे. पण समाधान एवढच
आहे कि ह्या नवीन वर्षात मी सहकुटुंब सुखरूप प्रवेश केला. आणि मला वाटते कि
ह्या पेक्षा जास्त महत्वाचा असं दुसरं काहीच नसते. उगाच धिंगाणा घालण्यात
काय अर्थं आहे.
-भूषण जोशी
(दिनांक ०१-०१-२०१५)
No comments:
Post a Comment